Posts

Showing posts from March, 2016

तेजोमय स्वतंत्रवीर सावरकर (Tejomay Swatantryveer Savarkar)

Image
                प्रखर तेज, वाऱ्याशी स्पर्धा करणारा बुद्धीचा वेग, खडकासारखी कठोरता आणि प्रत्यक्ष बृहस्पतीनही शिष्यत्व पत्करावे अशी बुद्धीची प्रगल्भता, ज्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करायची ते थोर पुरुष म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.                                    Play In Audio   या थोर देशभक्ताने आयुष्भर फक्त देशसेवाच केली. स्वताच घर अथवा संसार असा कधी केलाच नाही. आपल्या जीवन हयातीत बारा हजार (१२,०००) पानांचं साहित्य लिहून ठेवलं. इंग्रजीतील प्रत्येक शब्दाला मराठीत पर्यायी शब्द शोधला आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे वैभव वाढवले आणि भाषा समृद्ध केली.           स्वातंत्र्यवीर सावरकर देशकार्यासाठी इंग्लंडमध्ये शिकत असताना, पुस्तकातून आपल्या क्रांतिवीरांना शस्त्र पाठवली. देशप्रेमासाठी भर समुद्रात उडी मारून सतत चार दिवस पोहत राहिले आणि पोहताना मृत्यू समोर दिसत असताना देशावर कविता केली,‘ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला...’. स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः ब्राम्हण असून मागास्वर्गीयांसाठी अनेक आंदोलने केली. रत्नागिरीत पतित पावन मंदिरात

‘ईश्वर नाकारण्याचा अट्टाहास का?’

Image
                           Play In Audio                    अलीकडील एक लेखक हे ईश्वराच्या अस्तित्वा विषयी भूमिका मांडत आहेत. त्यांचे लेख वाचल्यानंतर अश्या प्रकारच्या नकारत्मक लिखाणाचा प्रतिवाद करावा वाटला म्हणून हा लेखन प्रपंच केला. सदर लेखामधून लेखक यांनी ईश्वर अथवा त्यचे अस्तित्व नाकारण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. परंतु ईश्वर आहे कि नाही? ईश्वराच्या अस्तित्वाची सत्यता काय? हे प्रश्न अगदीच निरर्थक वाटतात. कारण,ईश्वर हा सिद्धांत मांडण्याचा नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. ‘निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा’ या लेखात लेखक महाशय स्वतः म्हणतात की, ‘ईश्वर नाही हे गणितासारखे सिद्ध करता येत नाही’ म्हणजेच त्याला अनुभवून सिद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विज्ञान ही अनुभवाला महत्व देतेच .कारण,नुसताच सिद्धांत मांडून उपयोग नसतो तर त्याचा अनुभवही यायला लागतो. न्यूटनने मांडलेला सिद्धांत लोक अनुभवत होते, म्हणूनच तो सर्व मान्य झाला. तसेच,लेखक महाशय असेही म्हणतात की, ‘धर्मामुळे खूप दंगली,कत्तली झाल्या,अनेकांना आपले प्राण गमवावे लागले व हे सर्व धर्मश्रद्धांचे परिणाम आहेत. तसेच,दुसऱ्या धर्मिया